Showing posts with label Marathi Action Movies. Show all posts
Showing posts with label Marathi Action Movies. Show all posts

Bedhadak 2018 Marathi 720p WEB-DL 900mb

Bedhadak 2018 Marathi 720p WEB-DL 900mb




गुणवत्ता किंवा करिअर फक्त अकॅडॅमिक शिक्षणातच नसतं, ते कला आणि खेळांतही असतं. फक्त आपल्या शिक्षणव्यवस्थेने आणि मोठ्या प्रमाणावर समाजव्यवस्थेनेही कला-खेळांना एवढं दुर्लक्षित ठेवलंय की, त्यातलं निपुणत्व अजूनही करिअरच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं जात नाही. उलट कला-खेळांच्या मागे लागून आपला पाल्य भरकटतोय, असंच पालकांना वाटतं. परिणामी छंद म्हणून नाच-गाणं किंवा खेळ ठीक आहे, पण त्यातली प्रगती अकॅडॅमिक शिक्षणाला पर्यायी ठरू शकत नाही, अशीच धारणा बहुतांशी आजही आहे... याच धारणेवर प्रहार करण्याचं काम 'बेधडक' हा सिनेमा करतो आणि पालकांचं, गावाचं, राज्याचं, देशाचं नाव मोठं करण्याचं काम अकॅडॅमिक शिक्षणात कमी असलेला खेळाडूही करू शकतो, हे दाखवून देतो. 

अजय (गिरीश टावरे) आणि त्याच्या भावात (प्रसाद लिमये) हाच फरक असतो. अजयचा भाऊ अकॅडॅमिक शिक्षणात आघाडीवर, तर अजय बॉक्सिंगमध्ये. पण एका महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या त्याच्या वडिलांना (गणेश यादव) ही तुलनाच मान्य नसते. आयुष्यात अकॅडॅमिक शिक्षणच खरं, असं मानून ते अजयवर सतत अन्याय करत राहतात. त्याच्या बॉक्सिंगमधल्या यशाचं कौतुक सोडाच, पण बारावीच्या पूर्वपरीक्षेत परीक्षेत तो नापास झाला म्हणून, शंभर टक्के निकाल लागावा यासाठी त्याला महाविद्यालयातून काढूनच टाकतात... नव्हे एका क्षणी घरातूनही हाकलून लावतात. 

अजय घरातून बाहेर पडल्यावर पुढे नेमकं काय होतं, अजयचा संघर्ष यशस्वी होतो का, तो स्वत:ला सिद्ध करतो का आणि महत्त्वाचं म्हणजे, आपल्या शिक्षणव्यवस्थेतील खोट्या आदर्शांचा बुरखा फाडतो का?... हे कळायला हवं असेल, तर त्यासाठी हा सिनेमाच पाहायला हवा... 

'बेधडक ' सिनेमाची कथा-मांडणी खूपच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे धक्कातंत्र किंवा उत्कंठा ताणून धरण्याच्या पातळीवर हा सिनेमा तग धरत नाही. प्रेक्षक आधीच अंदाज बांधून मोकळे होतात. साहजिकच प्रेक्षकांना बांधून ठेवण्याच्या कसोटीवर सिनेमा उतरत नाही.


सिनेमात गणेश यादव, अशोक समर्थ (अजयचे बॉक्सिंगचे प्रिशक्षक), अनंत जोग असे तगडे कलाकार आहेत आणि त्यांनी आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावली आहे. अजयच्या आईच्या भूमिकेतील स्नेहा रायकर आणि प्रेयसीच्या भूमिकेतील नम्रता गायकवाड यांनीही आपल्या भूमिका नीट निभावल्यात. मात्र, अजय या नायकाच्या भूमिकेतील गिरीश टावरे बॉक्सरच्या शरीरयष्टीच्या दृष्टिकोनातून चोख असला तरी, अभिनयात मार खातो. कित्येकदा तो अवघडलेला वाटतो. 

सिनेमातील तांत्रिक बाबी बेतास बात आहेत. सिनेमातली गाणीही ठाकठीक आहेत. त्यांचा फार प्रभाव पडत नाही. उलट पार्टीतलं एक गाणं त्याचे शब्द आणि संगीतामुळे खटकतं. कारण कुठल्याही गाण्यासाठी पार्श्वभूमीही तशीच लागते. सोफिस्टिकेटेड पार्श्वभूमीवर उडत्या चालीचं लोकधाटीचं गाणं कसं चालेल? परंतु, हा सिनेमा बनवताना फार काही विचार केलेला नाही हे जाणवतं! 

IMDB Ratings: N/A
Genres: Action, Drama, Sport
Language: Marathi
Quality: 720p WEB-DL
Size: 928mb
Director: Santosh Manjrekhar
Writer: Govind Tukaram Taware
Stars: Girish Taware, Ganesh Yadav, Ashok Samarth




https://we.tl/b-mHuVKQmrmjhttps://sharer.pw/file/g62wuNXg9RK

Mulashi Pattern-Marathi Action movie



IMDB Ratings: 8.0/10
Genres: Crime, Drama
Language: Marathi
Quality: 720p CBRip
Size: 1054mb
Director: Pravin Vitthal Tarde
Writers: Kiran Dagade Patil, Pravin Vitthal Tarde
Stars: Sunil Abhyankar, Om Bhutkar, Kshitish Date
Movie Plot: A stark portrayal of the hardships faced by farmers, Mulshi Pattern tackles some of the raging issues of our times. The film lays bare the deep flaws of the system which turns the farmer into a criminal and a social outcast.

माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक समजुतीचा असतो. माणसाने स्वत:भोवती नैतिकतेचे आवरण घेतले. काय करावे, काय करू नये, कसे वागावे, याविषयी अलिखित; परंतु ठळक नियम ठरविले. प्राण्यांमध्ये हे नसते. जंगलाचा कायदा ‘जीवो जीवस्य जीवनम’ असा चालतो. जो दुर्बळ असतो, तो सबळाचा घास होतो आणि पुढे तो सबळही कोणाचा तरी घास होतोच. आपल्यापैकी कोणी असे वागू नये, साऱ्यांना जगण्याला पुरेसा वाव मिळावा, यासाठी माणसाने कायदे केले. चौकटी उभारल्या. या चौकटी, कायदे मोडून जेव्हा कोणीतरी जंगलाच्या कायद्याने वागू लागतो, तेव्हा माणसाच्या जगात जंगलाचा पॅटर्न सुरू होतो. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट या अंतहीन आणि रक्तरंजीत पळापळीचा मागोवा घेत राहतो. 

ही कथा मुळशी तालुक्याची असली, तरी ती ‘प्रगत’ शहरांच्या बाजूला असलेल्या कोणत्याही भागाला लागू होईल. या कथेत आपली जमीन विकलेले एक शेतकरी कुटुंब आहे. गावचा पाटील आणि असलेल्या सखाराम (मोहन जोशी) या कर्त्या पुरुषाने जमीन विकून आलेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डरकडे वॉचमनची नोकरी स्वीकारलेली आहे. त्याचा मुलगा राहुल (ओम भूतकर) हे सारे पाहतो आहे आणि वडिलांना सतत टोचतो आहे. हातातील सारे काही संपल्यानंतर हे कुटुंब पुणे शहरात येते. वडील मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करू लागतात. एका झटापटीत मुलगा तुरुंगात जातो आणि तेथेच त्याला नान्या भाई (प्रवीण तरडे) हेरतो. त्याला आपल्या कळपात सामील करून घेतो. या मुलाच्या एकंदर वागण्यामुळे त्याचे नाव बकासूर पडते आणि हा बकासूर एक दिवस आपल्या भाईचाच घास घेतो. आता तो सार्वभौम होतो. नियमाला बांधलेले असल्यामुळे पोलिस खाते फार काही करू शकत नसते. इन्स्पेक्टर कडू (उपेंद्र लिमये) त्यावर एक क्लृप्ती काढतात. राहुल भाई डोके लढवून एक एक शिडी चढतो आणि बरोबरीने वैरीही निर्माण करतो. घरचे मुलाच्या गुन्हेगारीतून आलेल्या पैशांवर जगणे नाकारतात. पुढे शेवट अपेक्षित वळणाने जातो.


कथा साधी, सरळ असली, तरी त्याची मांडणी, संवाद आणि पटकथा या बाबतीत लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चांगले काम केले आहे. एखाद्याच्या डोक्यात खून चढतो म्हणजे किती, साऱ्याच गोष्टींचे टोक गाठतो म्हणजे किती, आपल्याकडे पैशाने विकत घेण्यासारखी नसणारी गोष्ट दुसऱ्याकडे असणे किती बोचते, हे दर्शविणारे हॉटेलमधील दृश्य अंगावर काटा उभा करते. चित्रपट ज्या गोष्टीमुळे संपतो, ती या अव्याहत चाललेल्या चक्राचे प्रतिनिधित्व करते. ओम भूतकर हा अभिनेता त्याची भूमिका जगला आहे. डोक्यात राग असलेला, साऱ्याचा दोष आपल्या वडिलांच्या निर्णयावरच मारू पाहणारा आणि वडिलांच्या ओठांवरचे हास्य हरपले आहे, याचा साक्षात्कार झाल्यानंतर खचलेला भाई तो ताकदीने रंगवतो. मोहन जोशी तो बाप उत्तम उभा करतात. 

जमीन विकल्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून कधीच उतरत नाही आणि खाली झुकलेली नजर अधिक बोलकी होते. महेश मांजरेकरांचे पात्रही परिस्थितीमुळे ओझी वाहणारे. त्यांच्या संवादांतून अनेक गोष्टी उमजत जातात आणि त्यांचे असणे अधिक गहिरे करतात. बकासुराचा घट्ट मित्र असलेला गणेश (क्षितिश दाते) उत्तम. बकासुराचे विरोधक असणारे आणि खरेतर त्याच्या कुवतीशी बरोबरी करू न शकणारे भाई रमेश परदेशी आणि देवेंद्र गायकवाड यांनी चांगले उभे केले आहेत. वकिलाची भूमिका सुनील अभ्यंकर छान साकारतात. अभिनय, चित्रीकरण, संवाद या पातळ्यांवर जमून आलेल्या या चित्रपटावरील पकड मध्यंतरानंतर थोडी सैलावते. ‘आरारा’ हे गाणे जमले आहे, त्याहीपेक्षा त्यातील वळण अधिक अंगावर येणारे. संकलन आणि थोड्या रेंगाळणाऱ्या जागा अधिक काटेकोरपणे सांभाळल्या असत्या, तर चित्रपट अधिक उत्तम झाला असता. 

हा चित्रपट पाहताना आपल्याला वारंवार जंगलाच्या कायद्याची आठवण येत राहते. खरेतर असे म्हणणे थोडे चूक; कारण जंगलामध्ये भूक लागल्याशिवाय कोणी कोणाची शिकार करत नाही. माणसाने उभारलेल्या या काँक्रीटच्या जंगलात वखवख थांबतच नाही. या वखवखीचा शेवट या साऱ्याच भाईंसारखा अपरिहार्य असला, तरी त्याची तोपर्यंतची चमक अनेकांना आकर्षित करून घेते आणि खरा धोका तोच आहे. काही वेळा जमीन विकली जाणे अपरिहार्य होते. त्यानंतर आलेल्या पैशांचे नियोजन करणे जमायला हवे. त्यासाठीची जी उपजत शहाणिव असते, ती पैशांचा चकमकाट आणि त्यातून मिळणाऱ्या पोकळ डामडौलापुढे खुजी ठरते. ‘माझे वडील अर्धा एकरच जमीन कसतात; पण अभिमानाने’ हे उदय भाऊंचे वाक्य त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे. ते समजेल, तेव्हा हा पॅटर्न पुन्हा एकदा माणसाच्या पातळीवर येण्याची शक्यता निर्माण होईल. 

DOWNLOAD LINKS :-