Showing posts with label Marathi Drama Movies. Show all posts
Showing posts with label Marathi Drama Movies. Show all posts

Khopa 2017 Marathi 720p WEB-DL 800mb


Khopa 2017 Marathi 350MB


नाऱ्या म्हणजे नारायणचं (संकर्षण कऱ्हाडे) तसं बरं चाललेलं असतं. जीवापाड प्रेम करणारे आई-बाबा(रूपलक्ष्मी चौगुले, यतीन कार्येकर) आणि मायेने जोजवणारे आजोबा-आत्या (विक्रम गोखले, आशा तारे), यांच्या छत्रछायेखाली तो आयुष्य छान जगत असतो. इंजिनीअरिंगऐवजी त्याचं लक्ष वेगवेगळे उद्योगधंदे करण्याकडे लागलेलं असतं. यश कशातच येत नसतं, परंतु त्याला कुणी काही बोलतही नाही. कारण तो सगळ्यांचा लाडका असतो. सगळेजण त्याला आणि त्याच्या मनाला फुलासारखे जपत असतात. नात्यांची एक सुरेख विण या कुटुंबात बघायला मिळत असते. घर असावं तर असं आणि घरातली माणसं असावीत तर अशीच, असंच कुणालाही नाऱ्याचं कुटुंब पाहून वाटावं...


... पण एक दिवस कुणाची तरी कळ काढलेला नाऱ्या चुकून अडगळीच्या खोलीत जाऊन लपतो. नि तिथे त्याच्यासमोर भूतकाळ उभा राहतो, गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची मालिका घेऊन. काय खरं मानावं आणि काय खोटं, हेच त्याला कळत नाही. आजवर सुरेख नात्यांनी बांधलेला आणि मायेच्या भावनेने विणलेला त्याचा खोपा उद्ध्वस्त होतो.

हा खोपा पुन्हा सांधला जातो का, त्यातली माणसं पुन्हा एकत्र येतात का आणि पुन्हा मायेचा ओलावा निर्माण होतो का, ते पाहण्या-अनुभवण्यासाठी 'खोपा' सिनेमा प्रत्यक्षच पाहावा लागेल. मात्र एक नक्की की हा सिनेमा तुम्हाला आपल्या नात्यांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडेल. या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे ३० सप्टेंबर १९९३ला लातूर जिल्ह्यातील किल्लारीला झालेल्या भूकंपाचा अतिशय सकारात्मक वापर 'खोपा' मध्ये करण्यात आला आहे. किल्लारीतील भूकंपाने होत्याचं नव्हतं केलं, जिवंत माणसांना आयुष्यभराचं दुःख दिलं. नात्यांची पार मोडतोड केली. परंतु हीच मोडतोड जोडण्याचा कलात्मक प्रयत्न 'खोपा'मध्ये करण्यात आला आहे.

'खोपा'चा बाकी आशय आणि एकूण निर्मिती यथातथा आहे. परंतु कथेच्या पातळीवर खोपा नक्कीच चांगला आहे. संकर्षण, विक्रम गोखले, यतीन कार्येकर सगळ्या महत्त्वाच्या कलाकारांची कामं चांगली झाली आहेत. भारत गणेशपुरे यांनी खलनायकाची भूमिकाही चांगली वठलीय. गीत-संगीतही ठाकठीक. मात्र लोकगा‌यिका गोदावरी मुंडे यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर गायलेलं गाणं, जुनी वेदना मुखर करणारं आहे.




Hampi 2017 Marathi 720p WEB-DL 750mb

इब्राहिम अफगाण

पंचवीसेक वर्षांची एक तरुणी हंपीला येते. तिचे आईवडिल घटस्फोट घेत असल्याने ती अस्वस्थ आहे. त्यामुळे तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला आहे. खरे प्रेम नाहीच असं ती म्हणते. मग तेथे तिला अर्थातच एक तरुण भेटतो आणि शेवटी तिला खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होतो.

हे आहे चित्रपटाचे कथासूत्र. कथेचा परीघ आकर्षक आहे, आव्हानात्मक आहे आणि हंपीसारख्या सुंदर पार्श्वभूमीवर घडत असल्याने कुतूहल वाढवणारा आहे. कारण, उत्तम चित्रपट, उत्क़ृष्ट कथा दुःखाचं निवारण करतात. त्यातील पात्रं या दुःखनिवारणाच्या प्रक्रियेतून जातात आणि जीवनाचा नवा दृष्टीकोन प्राप्त करतात. चित्रपटातून या पात्रांच्या माध्यमातून दर्शकही या प्रवासात सहभागी होतात आणि तेही तो नवा दृष्टीकोन मिळवतात आणि त्यांच्याही दुःखाचं निवारण होतं.

हे होण्यासाठी प्रारंभाच्या एका बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंतचा पात्राचा प्रवास जितका महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा त्याच्यासोबत होणारा प्रेक्षकांचा प्रवासदेखील. त्यासाठी पात्रांची रचना पटणारी, ठोस वाटायला हवी. त्या पात्राच्या दुःखाशी प्रेक्षकाने एकरूप व्हायला हवं. आणि ते साध्य करण्यासाठी ते दुःखही अस्सल हवं. खोटे दुःख मनाला भिडत नाही. ते सत्य असण्याची गरज नाही, ते प्रामाणिक आणि खरं मात्र असायला हवं. त्या गोष्टीच्या अभावामुळे एरव्ही नेहमीच भावनिक विरेचनाद्वारे आवडू शकणारे अनेक घटक असूनही हंपी अपुरा, वरवरचा आणि कृत्रिम वाटतो.


मानववंशशास्त्रात पदवी प्राप्त केलेली, उत्तम कथ्थक करणारी, हॉट पँट घालून बॉयकट केलेली आणि पुलंच्या आवाजातील बोरकरांची कविता ऐकणारी ईशा आईवडिलांच्या घटस्फोटामुळे अस्वस्थ व्हायला ती काही शाळकरी मुलगी नाही. प्रेमावरचा विश्वास उडाला आहे, हे मान्य करायचं तर इतक्या आयुष्यात तिचा प्रेमभावनेशी सामना झाला नाही असं मानणं कठीण आहे. बोरकरांसारख्या कवीच्या कविता का वाचते याचेही आकलन होत नाही. तीच गत अन्य पात्रांची. तिला भेटणारा कबीर हा आर्किटेक्ट आहे पण तो हिप्पीसारखा हंपीत फोटो काढत राहतोय. तोही दुर्गा भागवतांची पुस्तकं वाचतो. तसेच तिला गावात घेऊन येणारा रिक्षावाला तथा गाईड या चित्रपटात का आहे असा प्रश्न पडतो. कारण तो थोडी कॉमेडी शिंपडून भरपूर माहिती देण्यापलीकडे कथेत कोणतीही भर घालत नाही. ईशा सोडून बाकी कोणीही तोंड उघडलं की विकीपिडीया आणि ओशोच बाहेर पडतं. त्यामुळे कोणी बोलायला लागले की आता पाच मिनिटं तरी ज्ञान पाजळणार हे उघडच होतं. एकेकाळी लोक जसे हिप्पी सारखे राहायचे, तसे ते हंपीत राहतात. चित्रपटाचं नाव हंपी आहे, मात्र कथेचा आणि हंपी गावाचा तसा जैविक संबंध घडून येत नाही.

मात्र या पैकी अनेक दोषांची भरपाई अमलेंदूच्या कॅमेऱ्याने केली आहे. त्यातील छायाचित्रण बघण्यासाठी चित्रपट पाहायला जावं अशा प्रकारे त्याने नैसर्गिक उजेडाच्या साह्याने आणि मॅजिक लाईट मध्ये सगळे दोष विसरायला लावणारी फोटोग्राफी केली आहे.
IMDB Ratings: 8.0/10
Genres: Romance
Language: Marathi
Quality: 720p WEB-DL
Size: 757mb
Director: Prakash Kunte
Writer: Aditi Moghe
Stars: Priyadarshan Jadhav, Chhaya Kadam, Sonalee Kulkarni
Movie Plot: When Isha, sets out to Hampi to re-discover herself, she meets a myriad of people, including Kabir who helps her find happiness in the little things. Together they go through life-changing events, while their friendship blossoms into something more beautiful.
.


Pushpak Vimaan

Pushpak Vimaan




IMDB Ratings: 8.1/10
Genres: Drama
Language: Marathi
Quality: pDVDRip
Size: 699mb
Director: Vaibhav R. Chinchalkar
Writer: Vaibhav R. Chinchalkar
Stars: Subodh Bhave, Mohan Joshi, Gouri Mahajan
Movie Plot: An 83-year-old man, Tatya, an ardent devotee of Saint Tukaram firmly believes the age-old folklore, which says that the saint boarded the Pushpak Vimaan and set off to heaven, to be true. He also harbors the dream of flying in Tukaram’s mystical vehicle. The movie, with a touch of humor, showcases the emotions shared between a grandfather and a grandson.

स्वप्नं म्हणजे, माणसाच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षांची पोतडी. ही पोतडी सहसा कधी रिकामी होत नाही... अन् तरीही माणून स्वप्नांमागे धावत असतो. कारण अनेकदा स्वप्नंच असतात प्रत्येकाच्या जगण्यामागची जिजीविषा. या स्वप्नांच्या आधारेच प्रत्येकजण चिवट आशा बाळगून असतो. 

... असंच एक स्वप्न आहे 'पुष्पक विमान' चित्रपटातील तात्यांचं(मोहन जोशी). तात्या जळगावातील मोठे कीर्तनकार. तुकारामांना सदेह वैकुंठाला घेऊन जाणाऱ्या पुष्पक विमानाचं कीर्तन म्हणजे तात्यांचा हुकमी एक्का. तात्यांनी हे कीर्तन सुरू केलं की, उपस्थित श्रोते त्यात रंगून जातच, परंतु पुष्पक विमानाचं वर्णन करता करता तात्यांची स्वत:चीच अशी ब्रह्मानंदी टाळी लागायची की त्यांच्या चित्तचक्षुंसमोर प्रत्यक्ष पुष्पकविमानच अवतरत असे. प्रत्यक्ष विष्णुने तुकारामांना आणण्यासाठी पाठवलेले हे पुष्पक विमान म्हणजे, तात्यांच्या भावभूमीतलं अंतिम सत्य जणू. त्यामुळेच त्यांचा नातू विलास (सुबोध भावे)ने कितीही सांगितलं की, विमानाचा शोध राइटबंधुनी लावला, तरी ते त्यांच्या डोक्यात कधीच शिरत नाही. 

पुष्पक विमानातून तुकारामांचं सदेह वैकुंठाला जाणं, या मिथकाशी तात्या एवढे एकरूप होऊन जातात, की एकदा मुंबईला आलेल्या तात्यांना विलास जेव्हा आकाशातून उडणारं खरंखुरं विमान दाखवतो, तेव्हा त्यांना ते विष्णुचं पुष्पक विमानच वाटतं आणि सतत त्याचंच चिंतन केल्यामुळे तुकाराम आपल्याला पुष्पक विमानात बोलावत आहेत, असे आभास त्यांना व्हायला लागतात... मग सुरू होतो तात्यांचा पुष्पक विमानात बसण्याचा धोशा. 

तात्यांची ही स्वप्नपूर्ती होते का? विलास त्यांना पुष्पकविमानाची सैर घडवतो का? या प्रश्नांच्या उत्तरपूर्तीसाठी तुम्हाला सिनेमाच बघायला हवा आणि सिनेमा तुमचा वेळ कारणी लावेल एवढं नक्की! तरीही कथेचा मूळ जीवच बचक्याएवढा असल्यामुळे सिनेमात घडत फारसं काहीच नाही. मधे मधे सिनेमा कंटाळवाणा होतो, पण कीर्तनवजा गाण्यांनी ही उणीव भरुन काढलेली आहे.


खरंतर सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट छान आहे. सिनेमातल्या पात्रांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना-संवादांना दिलेली अर्कचित्रात्मक शैली सुरेख आहे. पण केवळ याच्यावर सिनेमा तारला जाऊ शकत नाही. सिनेमातील तांत्रिक बाजू कितीही चांगल्या असल्या, तरी सिनेमाला एक बांधीव कथा लागतेच आणि त्या कथेचा जीव अगदी लहान असून चालत नाही. अन्यथा दिग्दर्शकाला खेळायला पुरेसा अवकाश मिळत नाही. 'पुष्पक विमान'मध्ये नेमकं असंच झालंय. सिनेमाचे मुख्य नायक तात्या आहेत आणि त्यांच्या स्वप्नाभोवतीच सिनेमा फिरतो. परंतु कथानक आणि त्यातील पात्रांविषयी जी आश्वासकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हायला हवी, ती निर्माण होत नाही. परिणामी सिनेमाचा आशय प्रेक्षकांच्या थेट हृदयात उतरत नाही, किंबहुना तो खूप भाबडा वाटतो. आज ग्रामीण भाग कितीही मागासलेला असला, तरी त्याला विमान ठाऊक असतंच. आजच्या काळात तर हवेतून उडणारं विमान ठाऊक नसलेला माणूस सापडणं विरळाच. या पार्श्वभूमीवर तात्यांना विमान ठाऊक नाही, हे सत्य पचवणं प्रेक्षकांना जरा कठीणच जाईल. 

मात्र भाबडे, तरी काहीसे डामरट स्वभावाचे तात्या, मोहन जोशीनी ज्या ताकदीने साकारलेत, त्यासाठी त्यांना शंभराहून अधिक गुण द्यावे लागतील. मुंबईला गेलेल्या विलासची वाट पाहणारे तात्या, तो आल्यावर डोळ्यांत चमक आलेले तात्या, कोकणातल्या नातसुनेला फणसावरुन सतत टोचून बोलणारे इरसाल तात्या, अगदी तुकोबाच्या भेटीसाठी आणि पुष्पक विमानात बसण्यासाठी आतुर झालेले तात्या... या तात्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. सिनेमातील इतर पात्रंही आपापलं काम चोख करतात. सुबोधच्या भूमिकेला तसा फार स्कोपच नाही, त्यामुळे विलासचं पात्र तो सहज साकारुन जाते. त्याच्या बायकोच्या, स्मिताच्या भूमिकेत गौरी महाजनही ठीक, फिरोजच्या भूमिकेतील सुयश झुंजुरकेही मस्त. विशेष म्हणजे तात्यांची, गावाकडे त्यांना जेवण घालणारी शेजारीणही फर्मास. गायक राहुल देशपांडे तुकोबांच्या भूमिकेत भेटतो. 

या सिनेमातली गाणी ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यांचं थोडं बळ 'पुष्पक विमान'ला मिळू शकतं! 




https://9xupload.me/fwro1hqr0hg4http://www.indishare.me/4s1tyxaofedghttps://clicknupload.org/trkrglmrqtk8https://openload.co/f/kV43czFoRJ4/Pushpak_Vimaan_2018_Marathi_www.9xmovies.org_pDVDRip_x264_700MB.mkvhttps://9xplay.live/6k1cj6wdfi1jhttps://bdupload.info/yr8qlvbaq4lohttps://uptobox.com/nf3bxtziimhuhttps://hubfiles.ws/cf780b309fb6526ehttps://userscloud.com/mu3zgfhn3kekhttps://mirrorace.com/m/1sykthttps://uploadbaz.net/jbt8g5u9dlut

KACCHA LIMBU MARATHI MOVIE DOWNLOAD


KACCHA LIMBU MARATHI MOVIE DOWNLOAD


कोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईतील गिरगावातील चाळीत राहात असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात मतिमंद मूल जन्माला आल्यावर आणि तो केवळ शरीराने मोठा झाल्यावर या जोडप्याच्या आशाआकांक्षांची राखरांगोळी होते. साधे शरीरसुख त्यांना घेता येत नाही. असा प्लॉट असलेला कच्चा लिंबू हा चित्रपट अभिनय, कलादिग्दर्शन आदी आघाड्यांवर उत्तम उतरूनही कालबाह्य मूल्ये, सोयीचा शेवट आणि बदललेल्या जगाचे भान नसल्या कारणाने मर्यादित बनला आहे. कथेतील काळ कधीचाही असला तरी त्याचा आस्वाद आजच्या काळातील रसिकच घेणार आहेत, त्यामुळे जनमाध्यमांचा भाग असलेल्या चित्रपट कलेत ते भान असावेच लागते.

मराठी साहित्यातील उत्तर आधुनिक कथांत प्रामुख्याने निम्नमध्यमवर्गीय समाज जीवनाचे प्रतिबिंब टिपले गेले. त्या काळातील जयवंत दळवी हे मोठे साहित्यिक होते आणि त्यांचे साहित्यही या नियमाला अपवाद नव्हते; त्यांनी तेव्हाचे धाडसी, नवीन विषय हाताळले तरी! ते साहित्यकृतींच्या माध्यमांतरासाठी प्रसिद्ध होते. म्हणजे कथेची कादंबरी, कादंबरीचे नाटक असे ते करीत. आपल्याच 'ऋणानुबंध' या कादंबरीवरून त्यांनी 'नातीगोती' हे तेव्हा गाजलेले नाटक त्यांनी लिहिले. ते पुढे हिंदीतही आले.


आता याच साहित्यकृतीवरील चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अभिनेत्याला दिग्दर्शक बनावेसे वाटणे, गायकाला अभिनेता व्हावेसे वाटणे हे डॉक्टरला गायक व्हावेसे वाटणे यापेक्षा फार वेगळे नाही आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्याने आपला चित्रपटाच्या तंत्र आणि कलेवर इतर अनेक नवीन दिग्दर्शकांच्या तुलनेत बरी पकड असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थात त्याला अत्यंत उत्तम कलावंत, तंत्रज्ञ याची साथ मिळाली आहे. मात्र यातील प्लॉट, त्यातील वास्तव आणि काळ याबरोबरच त्यातील नैतिक संघर्षाच्या पातळीवर गोंधळाचा वाटतो.

बाप आणि मुलगा किंवा मुले आणि पालक यांच्यातील संघर्षाच्या शेकडो कहाण्या आहेत आणि असतील. बापानेच मुलाच्या जिवावर उठणे, त्याने आपल्या जगण्यालाच नाकारणे हे उत्तम प्लॉटचे नमुने होऊ शकतात. तसेच, यातील अपराधी भावनेची थीम तर अनेक मोठ्या कलाकृतींचा ऐवज ठरली आहे. मात्र, थीम प्रत्यक्ष पात्राने बोलण्याऐवजी ती केवळ जाणवण्याच्या पातळीवर ठेवली असती तर बरे झाले असते.

यातील पात्रे अभिनयातून जिवंत वाटत असली तरी असे लोक कुठे आहेत असे निदान श्रीकांत पंडित या पात्राकडे पाहून वाटते. एकेकाळी ही नितीमूल्ये होती, आता नाहीत. म्हणजे जग अनैतिक बनले असे नव्हे. तर प्रत्येक काळ आपले स्वतंत्र मूल्य घेऊन येतो. मंतिमंद याची व्याख्या, संशोधन, समज आणि मदतीचे जाळे बदलले आहे, आणि लैंगिकतेचेही तेच आहे. ही कथा त्या काळात ठेवणे ही प्लॉटची गरज नाही.

हा कृष्णधवल चित्रपट बनवण्याचा प्रयोग का आणि ही कथा ऐंशीच्या दशकात असण्याचे कारण काय, हे प्रश्न कायम राहतात. त्याची उत्तरे कथेची किंवा दिग्दर्शकाची सोय या पलीकडे काहीही सापडत नाही.

Naal 2018 Marathi 720p HDRip 850mb

Naal Marathi Movie download 2018 


IMDB Ratings: 9.2/10
Genres: Drama
Language: Marathi
Quality: 720p HDRip
Size: 874mb
Director: Sudhakar Reddy Yakkanti
Writers: Nagraj Manjule, Sudhakar Reddy Yakkanti
Stars: Nagraj Manjule, Devika Daftardar, Shrinivas Pokale
Movie Plot: NAAL Marathi Movies resolves story of Chaitanya, an eight-year-old mischievous boy. Living in a remote village in Maharashtra, along with the banks of a river, he is fathered by a small-time landlord and pampered by a loving and caring mother. Naal is attached with Chaitanya’s emotional world and follows him on an unexpected journey.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या गोष्टी सांगत असतानाच नागराज मंजुळेसारखा निर्माता-दिग्दर्शक वास्तवावर नेमकं बोट ठेवत असतो. म्हणजे तो सिनेमाच्या माध्यमातून चार घटका रंजनाचा मार्ग अवलंबतोच. मात्र, हे रंजन टिपिकल ‘फिल्मी’ होणार नाही, या रंजनाची प्रेक्षकांशी नाळ तुटणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतो. सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित नाळ सिनेमाही अशीच एक वास्तवाची गोष्ट सांगतो. गावाकडचं जातवास्तव, ऐन तारुण्यात प्रेमाच्या आगीत होरपळणं असे विषय हाताळल्यानंतर नागराज ‘नाळ’ या सिनेमातून एका लहान मुलाचं भावविश्व उलगडतो. आई आणि मुलाचे भावबंध उलगडतो. अर्थात आठ वर्षांच्या चैतन्यची ही गोष्ट केवळ त्याची गोष्ट राहत नाही, तर लहानांसोबत मोठेही या गोष्टीत गुंततात. त्याच्या भावविश्वात हरवून जातात, गुंतून जातात. लेखक-दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी एक अतिशय नेटका चित्रपट आपल्यापुढं सादर करतात. मुळात कागदावरच सशक्त असलेला हा सिनेमा अप्रतिम अभिनय, पार्श्वसंगीत आणि नयनरम्य छायाचित्रणाच्या जोरावर पडद्यावर प्रभावी ठरतो. टिपिकल मनोरंजनाची वाट नाकारून काही वेगळं पाहू इच्छिणाऱ्यांनी ‘नाळ’चा अनुभव घ्यायला हरकत नाही. 

नदीच्या काठी वसलेल्या एका लहान खेडेगावात चित्रपटाची गोष्ट घडते. अंदाजे आठ वर्षांचा चैतन्य (श्रीनिवास पोकळे) हाच या सिनेमाचा नायक. चैतन्यचे वडील (नागराज मंजुळे) गावातील जमीनदार आहेत. चैतन्य आपले वडील, आई (देविका दफ्तरदार) आणि आपल्या आजीसह गावात राहत आहे. गावात दोस्तमंडळींच्या साथीने मस्त हुंदडत आहे. कोंबड्यांशी खेळत आहे, शेतात-जंगलात बागडत आहे. गोठ्यातल्या म्हशींसोबत रमत आहे. जवळच असलेल्या गावातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत आहे. अगदी ग्रामीण भागात आजही अनुभवायला येणाऱ्या ग्रामीण जीवनाचा तो मस्त आनंद लुटत आहे. त्याचं भावविश्व चितारण्याला लेखक-दिग्दर्शकाचे प्राधान्य आहे. त्याच्या आयुष्यात एकदम एक‘वादळ’ येतं. दूर गावावरून त्याचा एक मामा (ओम भूतकर) येतो आणि तुझी सध्याची आई ही खरी आई नाहीच, असं त्याला सांगतो. तुला दत्तक घेण्यात आलं असून, तुझी आई दूर गावाला राहते असं त्याला सांगण्यात येतं. अत्यंत निरागस अशा चैतन्यला ही गोष्ट खरी वाटते आणि मग तो सुरू करतो त्याच्या खऱ्या आईचा शोध. अक्षरश: दुधात मिठाचा खडा पडावा तसं त्याच्या जीवनाचं होतं. राहत असलेल्या आईकडं संशयाच्या नजरेने तो पाहू लागतो आणि एकूणच आईविषयी वाटणारं ममत्वही कमी व्हायला लागतं. चैतन्यने केलेल्या आईच्या शोधाची गोष्ट म्हणजे ‘नाळ’ हा सिनेमा. त्याला खरी आई भेटते का ? दरम्यानच्या काळात घरात आणखी काय घडतं? जन्म देणारी आई आणि दत्तक आई यांच्यातील फरक तो कसा ओळखतो आणि नक्की कोणत्या आईला तो आपलंसं करतो. त्याची नाळ नक्की कोठे जुळते? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नाळ पाहायला हवा. 

कोणत्याही प्रेक्षणीय सिनेमाची गोष्ट हीच खऱी सिनेमाचा नायक असते. इथेही तसंच आहे. सातत्यानं पुढं काय होतं, अशी उत्सुकता लागून राहिलेल्या या गोष्टीची हाताळणीही दिग्दर्शक संयतपणे करतो. वेळ घेऊन, थांबून ही गोष्ट आणि एकूणच चैतन्यचं भावविश्व उलगडतो. व्यवसायाने सिनेमटोग्राफर असणाऱ्या आणि सैराट, देऊळसारखे सिनेमे सजवणाऱ्या सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी दिग्दर्शनाच्या पदार्पणातच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काही प्रश्नांची उत्तरे देऊन, काही प्रश्नांची संदिग्ध उत्तरे देऊन आणि काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांवर शोधण्याचे काम सोपवून त्यांनी प्रेक्षकांच्या डोक्याला चालना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. अर्थात असं असलं तरीही सिनेमाचे संवादलेखन करणाऱ्या नागराज मंजुळेची छाप संपूर्ण सिनेमावर जाणवत राहते. सातत्यानं वास्तव उलगडण्याचा त्याचा प्रयत्न इथेही सुरूच राहतो. मायलेकाचे नाते उलगडताना म्हैस आणि रेडकूचे वापरलेले रूपकही नेटके. सुधाकर यांनी अगदी पहिल्या फ्रेमपासून सिनेमा उत्तमरितीने नटवला आहे. गावाकडचं जीवन, त्यातले बारकावे त्यांचा कैमेरा तरलतेने टिपतो. अद्वैत नेमळेकर यांचे पार्श्वसंगीत, अँथनी रुबेनची साउंड चित्रपटातील एक व्यक्तिरेखा म्हणूनच आपल्यासमोर येतात. गावाकडं जीवन दाखवताना ग्रामीण टच असलेल्या काही गोष्टी मुद्दामून सिनेमात दाखवल्या जातात. म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या चैतन्यच्या घरात टीव्ही आहे, इतर सुविधा आहेत. मात्र, तरीही त्याची आई अजूनही जात्यावरच पीठ कांडतेय, हे जरा खटकतं. मध्यंतरानंतर सिनेमाची गतीही काहीशी मंदावते. मात्र, पुन्हा शेवटाकडे सिनेमा ट्रैकवर येतो. नागराज, देविका दोघांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सर्वात भाव खाऊन जातो तो श्रीनिवास पोकळे. या बालकलाकाराने कमाल केली आहे. विविध प्रसंगातो तो सहज अभिनयाने बाजी मारतो. ‘जाऊ दे न वं’ गाणही धम्माल. थोडक्यात काय तर नाळ ही अगदी रोजच्या जगण्यातील गोष्ट आहे, त्याचा बाज ग्रामीण आहे, त्यातलं भावविश्वही गावातलं आहे. मात्र, त्यात सांगितलेला आशय अगदी कोणालाही लागू आहे. आई-मुलाच्या विश्वाची सफर एकदा करू शकतो. ढोबळमनानं हा लहानांचा सिनेमा असेलही. मात्र, तो मोठ्यांनाही तितकाच अपील होऊ शकतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सिनेमानं सांगायला हवं, असा आग्रह तो धरत नाही. फक्त जे आजूबाजूला घडतं ते दाखवतो, थेटपणे दाखवतो. फूल टू टाइमपासचा आग्रह न धरणाऱ्यांनी ही नाळ पाहायला हवी. प्रेक्षकांशी असलेली नाळ तुटणार नाही, याची खबरदारी निर्माता-लेखक-दिग्दर्शकाने घेतली आहे.